कणकवली : दिनांक : ३० डिसेंबर २०१९ :
गेली तीन वर्षे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ तालुका कणकवली शाखा कणकवली ते आंगणेवाडी पर्यंत एक दिवसीय पायी वारीचे आयोजन करते. यंदाही नाभिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारीचे चौथे वर्ष पूर्ण करताना सहभागी झालेल्या सर्व नाभिक ज्ञातिबांधवांना झालेला आनंद गगनात मावत नव्हता.
भालचंद्र संस्थानापासून ठिक सकाळी ६ वाजता गाऱ्हाणे सांगून वारीचे प्रयाण झाले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण, शहर अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण , सल्लागार सुभाष चव्हाण , खजिनदार रमेश आचरेकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , दशरथ चव्हाण , कनेडी अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, पत्रकार गणेश चव्हाण, महिला मंडळ अध्यक्षा संजना चव्हाण , उपाध्यक्षा प्रिया चव्हाण, महिला मंडळ सदस्या, कणकवली शहरातील तमाम नाभिक बंधू भगिनी मिळून एकूण ६० पेक्षा जास्त बांधव उपस्थित होते.
पायी प्रवास करताना भराडी देवी मातेचे दर्शन घेण्याची आस लागून राहिलेले सर्व नाभिक बांधव अगदी मनापासून पायी वारीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत होते. नाभिक ध्वज पताका कणकवली ते आंगणेवाडी अनवाणी पायाने नेण्याचे महत्कार्य नामदेव न्हावी यांनी केले. चालताना ' संत सेना महाराजांचा विजय असो ' असा जयघोष करत आपल्या बांधवांना भेटत भेटत पुढे पुढे मार्गक्रमण करत वारी आंगणेवाडी मुक्कामी दाखल झाली. तिथे गेल्यानंतर सर्वांनी ' भराडी मातेला वंदन केले. आपल्या नाभिक बांधवांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. झेंडे, पताका घेऊन निघालेले नाभिक व्यावसायिक बांधव पायी वारीमध्ये कमालीचे रममाण झालेले दिसत होते. आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र येत आणि आपल्या बांधवांच्या हिताचा विचार करत निघालेली पायी वारी पाहताना दर्शक देखील त्यात सहभागी होत नाभिक बांधवांना प्रोत्साहन देत होते.
आप्पा चव्हाण यांनी मसाला दूध , प्रवीण कुबल यांनी अल्पोपहार , चंद्रकांत चव्हाण व रमेश आचरेकर यांनी शीतपेय , भोजन व्यवस्था चंद्रशेखर चव्हाण व दशरथ चव्हाण यांनी केली. श्रावण गावचे नाभिक बांधव व पत्रकार गणेश चव्हाण यांनी सर्व बांधवांशी हितगुज करत उत्तम संवाद साधला. त्यांनी सर्वांना आईस्क्रीम दिले.
नाभिक संघटनेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवला जात आहे याबाबत कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवाच्या एकजुटीबद्दल इतर सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे.
गेली तीन वर्षे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ तालुका कणकवली शाखा कणकवली ते आंगणेवाडी पर्यंत एक दिवसीय पायी वारीचे आयोजन करते. यंदाही नाभिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारीचे चौथे वर्ष पूर्ण करताना सहभागी झालेल्या सर्व नाभिक ज्ञातिबांधवांना झालेला आनंद गगनात मावत नव्हता.
भालचंद्र संस्थानापासून ठिक सकाळी ६ वाजता गाऱ्हाणे सांगून वारीचे प्रयाण झाले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण, शहर अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण , सल्लागार सुभाष चव्हाण , खजिनदार रमेश आचरेकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , दशरथ चव्हाण , कनेडी अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, पत्रकार गणेश चव्हाण, महिला मंडळ अध्यक्षा संजना चव्हाण , उपाध्यक्षा प्रिया चव्हाण, महिला मंडळ सदस्या, कणकवली शहरातील तमाम नाभिक बंधू भगिनी मिळून एकूण ६० पेक्षा जास्त बांधव उपस्थित होते.
पायी प्रवास करताना भराडी देवी मातेचे दर्शन घेण्याची आस लागून राहिलेले सर्व नाभिक बांधव अगदी मनापासून पायी वारीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत होते. नाभिक ध्वज पताका कणकवली ते आंगणेवाडी अनवाणी पायाने नेण्याचे महत्कार्य नामदेव न्हावी यांनी केले. चालताना ' संत सेना महाराजांचा विजय असो ' असा जयघोष करत आपल्या बांधवांना भेटत भेटत पुढे पुढे मार्गक्रमण करत वारी आंगणेवाडी मुक्कामी दाखल झाली. तिथे गेल्यानंतर सर्वांनी ' भराडी मातेला वंदन केले. आपल्या नाभिक बांधवांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. झेंडे, पताका घेऊन निघालेले नाभिक व्यावसायिक बांधव पायी वारीमध्ये कमालीचे रममाण झालेले दिसत होते. आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र येत आणि आपल्या बांधवांच्या हिताचा विचार करत निघालेली पायी वारी पाहताना दर्शक देखील त्यात सहभागी होत नाभिक बांधवांना प्रोत्साहन देत होते.
आप्पा चव्हाण यांनी मसाला दूध , प्रवीण कुबल यांनी अल्पोपहार , चंद्रकांत चव्हाण व रमेश आचरेकर यांनी शीतपेय , भोजन व्यवस्था चंद्रशेखर चव्हाण व दशरथ चव्हाण यांनी केली. श्रावण गावचे नाभिक बांधव व पत्रकार गणेश चव्हाण यांनी सर्व बांधवांशी हितगुज करत उत्तम संवाद साधला. त्यांनी सर्वांना आईस्क्रीम दिले.
नाभिक संघटनेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवला जात आहे याबाबत कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवाच्या एकजुटीबद्दल इतर सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे.















































